Sunday, May 22, 2011

शाळा


     आज खुप दिवसांनी शाळा बघितली आणि आपसूक शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या , शाळेतले ते दिवस खूपच छान होते. एक स्वतःच विश्व होत, कसला फारसा ताण नाही, फारस कसलं बंधन नाही... मुक्त दिवस होते... आणि म्हणूनच कदाचित ते मुक्त पाखरासारखे उडूनही गेले. 
     मी साधारण आठवीत असेन, शाळेकडून आंतरशालेय स्पर्धेत घोषपथकात माझी निवड झाली होती. साधारण आठ ड्रम, एक ढोल, दोन झांजा आणि सोळा बासरीवादक आणि अर्थात आमची म्होरकीण, स्टाफधारक असे आम्ही अठ्ठावीस जणी होतो.  मी बासरी वादकांपैकी एक होते. साधारण तीन एक महिन्यात आम्ही सर्वप्रथम सा रे ग म वाजवायला शिकलो आणि लागलीच वेगवेगळे  राग, गाण्यांचे अचूक सूर आम्ही बासरीतून काढू लागलो. बासरी वादनातल्या  खुबी सांगायला प्रशिक्षक होतेच. आम्ही स्पर्धेची तयारी चालू केली होती, स्पर्धेच्या दृष्टीने गरजेच्या असलेल्या नविन नविन रचना करून पाहत शेवटी आम्ही आठ रचना पक्क्या केल्या. 
     स्पर्धेचा दिवस उजाडला, सकाळी लवकरच आवरून शाळेत दाखल झालो, आम्हाला न्यायला एक टेम्पो आला होता, स्पर्धेच ठिकाण शाळेपासून बऱ्यापैकी दूर होत. शाळेनी दिलेला चहा नाश्ता घेतला आणि वाद्य टेम्पो टाकत एक एक करून आम्ही टेम्पोत घुसलो. गणपतीचे नाव घेऊन आम्ही निघालो. स्पर्धेच्या ठिकाणी आम्ही पोहचलो, वेगवेगळ्या शाळेच्या मुली आल्या होत्या. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी,  मैदान भरलं होत. नउच्या ठोक्याला स्पर्धा सुरु झाली, एक एक करून संघ येऊन आपलं   कौशल्य दाखवू लागले. शेवटून तिसऱ्या क्रमांकावर आम्ही आखून दिलेल्या चौकोनात प्रवेश केला, स्पर्धेचे नियम पाळत आम्ही आमच कौशल्य दाखवायला सुरुवात केली. पहिल्या बारा मिनिटात सात रचना पूर्ण झाल्या, आमच्या प्रतिनिधीनी एकूण तीन वेळा स्टाफ हवेत उडवून झेलला होता,  स्टाफ जितके जास्त वेळा उडवला जाईल तितके आधी गुण खात्यावर जमा होतात, तसेच जर तो स्टाफ चुकून खाली पडला तर ती शाळा स्पर्धेतून तीन वर्षाकरता बाद होते. मनात उगाच धाकधूक होती, पण सगळ व्यवस्थित पार पडल, सातवी रचना बदलून आम्ही शेवटच्या रचनेत आलो, शेवटच गाण वाजवयला सुरवात केली, आणि बरोबर चौदाव्या मिनिटाला आम्ही आखून दिलेल्या चौकोनाबाहेर पडलो. स्पर्धा संपल्यावर बरोबर आलेल्या प्रशिक्षकांनी आम्हाला शाळेत जाण्याचा सल्ला दिला आणि आम्ही निकाल काय लागेल ह्याची उस्तुकता मनात ठेऊनच , शाळेत परतलो, साधारण आपल सादरीकरण कस झालंय ह्याची प्रत्येकालाच जाणीव होती त्यामुळे आपण नक्की जिंकूच अशी आम्हाला खात्री होती. असं म्हणतात ना You yourself are a good judge. आम्ही ठरवून टाकल होत आमचा विजय नक्की... आम्ही न राहवून येतानाच आरोळ्या द्यायला सुरवात केली ... शाळेच्या नावाची कीर्ती शहरभर पसरवायला आम्ही मागे पुढे बघितलाच नाही ... आम्ही शाळेत आलो आणि मुख्याध्यापिकांनी आम्हाला बोलावून घेतलं.. निकाल लागलेला नसताना तुम्ही कशासाठी आरोळ्या दिल्यात ह्या वरून आम्हाला खुप ओरडा बसला.. पुन्हा उगाच मनात शंकेची पाल चुकचुकली... आता जर आपण नाही जिंकलो तर? अजून ओरडा बसेल... आणि मोठा पोपट होईल तो तर वेगळाच... 
पुढचा अर्धातास आम्ही द्विधा मनस्थितीत आपण जिंकू की न जिंकू... निकालीची उस्तुकता शिगेला पोहचली होती. अर्ध्यातासानी प्रशिक्षक निकालाची बातमी घेऊन आले.. तृतीय क्रमांकांनी आम्ही जिंकलो होतो... आनंदाला सीमाच उरली नव्हती... प्रचंड जल्लोषात आम्ही शाळा दणाणून सोडली...घोष वादन करून आम्ही आमचं आनंद व्यक्त केला... शाळेच्या नावाच्या आरोळ्या जोरजोरात म्हणत आम्ही शाळा दणाणून सोडली... त्या आरोळ्या, ते शिक्षकांचे आणि शाळा मैत्रिणींचे कौतुकाचे चेहरे आजही लख्ख समोर आहेत...
        असे अनेक प्रसंग आठवतात... मी दहावीत असेन सहामाही परीक्षा झाली होती दिवाळी नंतर आम्ही शाळेत आलो... खुप बोर झालेले त्या दिवशी बाकावर शेजारी कोणीच नव्हत... गणिताचा तास चालू होता... आणि पानसे बाई खुप बोर काहीतरी सांगत होत्या मी खिडकीतून बाहेर  बघत होते ... बाईनी हे बरोबर हेरल... आणि मला उभ केल... काय चालू आहे तेजश्री? मी गप्प ... तोंडातून आवाजच फुटत नव्हता... थांब तुमच्या वर्गशिक्षिकेलाच सांगते..तापकीरच आहे ना वर्गशिक्षिका? .. नाहीतर आता तुमचे सहामाहीचे गुण कळल्यावरच बोलूयात आपण... असं म्हणत बाईनी पुढच शिकवायला सुरवात केली
          दुसर्यादिवशी पहिल्याच तासाला गुणपत्रिका मिळाल्या , गणित आणि शास्त्र विषयात सर्वाधिक गुण मलाच होते, गणित आणि शास्त्र दोन्ही विषय खुप लाडके असल्याने असे अव्वल गुण मिळण माझ्यासाठी नविन नव्हतच त्यामुळे मला काही आश्चर्य नव्हत वाटत पण अर्थात आनंद तर झालाच होता, तास संपला... दुसरा तास गणिताचाच होता, पानसे बाई आल्या, वर्गातली कुजबुज ऐकून आम्हाला त्यानी विचारलं काय मिळाल्या का गुणपत्रिका ? कुणाला सर्वाधिक गुण मिळाले ? माझ लक्षच नव्हत मी कसलतरी गणित सोडवत बसले होते... सगळ्यानी माझ नाव घेताच मी गडबडले बाई समोर उभी राहिले.. मला सर्वाधिक गुण मिळालेत बघून बाई अवाकच झाल्या होत्या त्यांच्या तोंडचे उद्गार अजून आठवतात... ' तेजश्री तुला सर्वाधिक गुण आहेत! ...आता तु बाहेर बघ, शिकवताना लक्ष दे किवा नको देऊ... मी काहीही बोलणार नाही तुला' ... आज ते वाक्य आठवलं की खुप हसू येत... 
         मी चौथीत असतानाची गोष्ट रांगोळीची स्पर्धा होती एक फुट बाय एक फुट अश्या चौकोनात रांगोळी काढायची होती... रांगोळी कधी हातात सुद्धा धरली नव्हती... माझ्या मैत्रिणीनी स्नेहलनी  माझं नाव देऊनही टाकल रांगोळीसाठी... आणि मी तुला शिकवीन रांगोळी कशी काढायची म्हणून अशी हमीही दिली .. मी निर्धास्त झाले... तिने शिकवलेल्या ७ ते ३ ठीपक्याच्या रांगोळीची मी खुप मनापासून तयारी केली, घरी येऊन बाबांच्या मदतीने कुठे कोणते रंग भरायचे ते ही ठरवलं... शनिवारी सकाळची शाळा झाल्यावर दुपारी स्पर्धा होती... सभागृहात खुप गर्दी होती सगळ्या मैत्रिणीच होत्या पण खुप छान छान रांगोळी काढणाऱ्या मला रांगोळी शिकवलेली स्नेहलही होती... सभागृहाच्या मध्यभागी एक मुलगी संस्कारभारतीची खुप मोठी रांगोळी काढत होती, वाटल अरे आपल्याला जो नियम सांगितलेला एक फुट बाय एक फुट त्याच काय झालं? मला उगाच न्युनगन्ड वाटू लागला  शेजारच्या एका मैत्रिणीला तिची आई रंग कसे भर ते सांगत होती...  वाटल अरे आपण पण आणायला हव होत का कुणाला... पण ही तर फसवणूक झाली... स्पर्धेत कशी काय मदत करतात पालक... मी दुर्लक्ष केल... आनंद मिळवण्यासाठी मी भाग घेतलेला जिंकन वगेरे फारच दुरची गोष्ट होती... बाहेर पाऊस पाडत होता माझा दादा घ्यायला आला ... मी कौतुकाने त्याला माझी रांगोळी दाखवली... आणि नंतर आम्ही घरी आलो .... मी विसरूनही गेले स्पर्धा वगेरे ... दुसऱ्या दिवशी सकाळ मध्ये बातमी तेजश्री पावसकरला तृतीय क्रमांक... मला आश्चर्यच वाटल... मला रांगोळी शिकवलेल्या  मैत्रिणीला किवा सभागृहाच्या मध्यभागी रांगोळी काढणाऱ्या त्या मैत्रिणीला बक्षीस नव्हत..नवल वाटल  परीक्षकांनी माझी रांगोळी बक्षीसासाठी निवडली होती... फार भारी वाटत होत होत.... प्रथम क्रमांक माझ्या शेजारी असलेल्या मैत्रिणीला जिची आई तिला मदत करत होती तिला मिळाला होता... फसवणूक केलेल्या मुलीला का बर प्रथम क्रमांक मिळाला असेल वाईट वाटल... काहीही असो मी सगळ्यात प्रथम रांगोळी काढली होती आणि मला बक्षीस मिळाल्याने माझा हुरूप तरी नक्की वाढला होता... न्यूनगंड गेला होता...पुढे जाऊन मी खुप रांगोळ्या काढल्या मला रांगोळी काढायचा नादाच लागला... आजही मी पाच बोटांची  रांगोळी शिकते आहे त्यासाठीची गोडी, आवड मला त्या रांगोळीस्पर्धेनी दिली... आणि हो आज तो तेव्हाचा माझ नाव छापून आलेला सकाळ पेपर बघितला की खुप छान वाटत.. ते शाळेतले दिवस पुन्हा यावेत असच वाटत ...                


तेजश्री 

2 comments:

  1. वाह... शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या.. आणि रांगोळी स्पर्धांमध्ये सर्वांनाच हा अनुभव येतोच बहुदा, कोणाला कोणी मदत करीत असते. कोणी बघून काढत असते... पण अभिनंदन :)

    ReplyDelete