Wednesday, May 4, 2011

चाफा


हे चाफ्याचे झाडं मी खूप दिवसापासून धोपट मार्गावर बघते आहे. तुम्ही जवळून निरीक्षण केलत तर तुम्हालाही जाणवेल की ह्याचा अर्धाच  भाग पाना-फुलांनी बहरला आहे तर अर्धा पर्णहीन आहे. ह्या झाडाकडे बघताना मला आपल्या समाजवर्गरचनेची राहून राहून आठवण होते. आपल्या समाजातही असेच असते नाही, काही लोक श्रीमंत असतात, बहरलेले, सुखसोयींनी पूर्ण, ह्या झाडाच्या डाव्या अर्धांगासारखे, तर गरीब त्याच्या उर्वरीत अर्धांगाप्रमाणे सुकलेले, ज्यांना सुख सोयी तर सोडाच पण दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांती असते. किती हा विरोधाभास! आणि त्यात आपली अर्थव्यवस्था अशी आहे  की श्रीमंत लोक अजून श्रीमंत होत आहेत गरीब अजून गरीब. समाजातली ही दोन टोक जर योग्य प्रकारे जवळ आली आणि एकमेकांना सहाय्य करू लागली तर कदाचित आजच समाजाच हे चित्र उद्या काहीस वेगळ असेल. कदाचित तेव्हा ह्या समाजरूपी झाडावर समसमान विभागलेली पान आणि फुल असतील.  फुल हे जर आपण सुख समृधीच प्रतिक मानल तर ही सुख समृद्धी सगळ्यांना मिळेल. आणि त्या वेळच ते समाजचित्र जास्त सुखावह असेल.




तेजश्री 
 

No comments:

Post a Comment